शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कोल्हापूर जि.प.च्या शाळांतील ४८ विद्यार्थी ‘इस्रो’ भेटीला,फेब्रुवारीमध्ये दौरा : निबंध स्पर्धेतून निवड; १५ लाख रुपयांची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 00:39 IST

कोल्हापूर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील ४८ विद्यार्थी फेबु्रवारीमध्ये ‘इस्रो’ भेटीला जाणार आहेत.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांसमवेत १२ अधिकारी, कर्मचारीही फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात ही भेट शक्य

कोल्हापूर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील ४८ विद्यार्थी फेबु्रवारीमध्ये ‘इस्रो’ भेटीला जाणार आहेत. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची निबंध स्पर्धा घेऊन आणि शिवाजी विद्यापीठामध्ये अंतिम फेरीतील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन ही निवड करण्यात आली आहे. यासाठी जिल्हा परिषदेने १५ लाख रुपयांची तरतूद केली होती.

या नावीन्यपूर्ण योजनेसाठी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पामध्येच तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना आठ दिवस आधी विषय देऊन निबंध स्पर्धा घेण्यात आली. प्रत्येक वर्गातील एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी अशांची तालुकास्तरावर निवड करून, त्यांना ऐनवेळी विषय देऊन तेथेच निबंध स्पर्धा घेण्यात आली. पाचवी ते आठवीच्या प्रत्येकी तीन अशा १२ आणि १२ तालुक्यांचे अशा १४४ विद्यार्थ्यांच्या शिवाजी विद्यापीठामध्ये मुलाखती घेण्यात आल्या व त्यातून अंतिम ४८ विद्यार्थी निवडण्यात आले. यामध्ये २१ विद्यार्थी, तर २७ विद्यार्र्थिनी आहेत. या विद्यार्थ्यांसमवेत १२ अधिकारी, कर्मचारीही जाणार असून, फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात ही भेट शक्य होणार आहे.

तीन मार्गांवर विमानप्रवासया सर्व विद्यार्थ्यांना तीन मार्गांवर विमान प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. कोल्हापूर येथून गोव्याला बसने, गोवा ते थिरूअनंतपुरम, थिरूअनंतपुरम ते बंगलोर आणि बंगलोर ते पुणे असा तीन मार्गांवरचा प्रवास विमानाने होणार आहे. पुन्हा पुणे-कोल्हापूर प्रवास बसने होईल.